कर्मचा-यांना घर व गाडी वाटणारा चौथी पास उद्योजक


देशातील सर्वच कर्मचा-यांना हेवा वाटावा असा आपल्या कर्मचा-यांना बोनस देणारे सावजीभाई ढोलकीया हे फक्त चौथी शिकलेले आहेत. मात्र त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि नम्रतेने त्यांना आज भारताती एक यशस्वी उद्योगपती बनवले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोट्यवधीचा बोनस देणारे 'हरिकृष्ण एक्स्पोर्ट'चे मालक सावजीभाई ढोलकीया यांनी एवढा मोठा बोनस देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
माझ्या कर्मचा-यांच्या कर्तृत्वाच्या तुलनेत मी त्यांना दिलेले बोनस अगदीच नगण्य असल्याचे मत व्यक्त केले. मी फक्त चौथी पर्यंत शिकलेलो आहे. १२व्या वर्षी मी शिक्षणाला राम राम ठोकला आणि हि-यांच्या व्यवसायामध्ये काम करण्यास सुरुवात केली. मी स्वत: कसलेही शिक्षण घेतलेले नाही. मात्र मी रोज वाचन करतो आणि रोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो, असे सावजीभाई यांनी स्पष्ट केले.
मी माझ्या भावांसहीत सुरतमध्ये असेच काम करीत होतो. आम्हा चार भावंडांपैकी एकानेही दहावीच्या पुढे शिक्षण घेतेले नाही. माझ्या सर्वात छोटा भाऊ दहावी पास असल्याचे ढोलकीया सांगतात. देवाच्या कृपेने मला माझ्या घरच्यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही कर्मचा-यांना बोनस देण्यासाठी ५० कोटींचे बजेट निश्चित केले होते. मी सर्वांसाठी गाड्याच घेणार मात्र नंतर आमच्या लक्षात आले की कंपनीतील २०० कर्मचा-यांकडे स्वत:चे घर नाही, म्हणून त्यांना घर देण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर ५०० कर्मचा-यांकडे घर आणि गाडी दोन्ही असल्याने आम्ही त्या प्रत्येकाच्या पत्नीसाठी हि-याचे दागिने देण्याचे निश्चित केले. गुजरातमध्ये अनेकदा नव-याला पाठिंबा देणा-या त्याच्या चांगल्या-वाईट परिस्थितीमध्ये ठामपणे त्याच्या पाठिशी उभ्या राहणा-या स्त्रीयांचे कौतुक केलेच जात नाही. म्हणून आम्ही मुद्दाम दागिने देण्याचा निर्णय घेल्याचे ढोलकीयांनी मुलाखतीमध्ये सांगितले.
मी खुप छोटा माणुस आहे तुम्ही मला मोठे केले आहे. आमच्या कंपनीच्या या निर्णयाची देशभरात चर्चा होईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र मला खात्री आहे की एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर इतर उद्योजकही त्यांच्या कर्मचा-यांना चांगल्या सोयीसुविधा देतील. आमच्या कंपनीमध्ये एक क्रिकेटचे मैदान आहे जे मी गांगुलीला लंडनमध्ये खेळताना पाहिल्यानंतर बांधले. येथे माझ्या कंपनीतील कर्मचारी क्रिकेट खेळातात आणि त्यांना मी पव्हेलियनमध्ये बसून पाहतो. आमच्या कंपनीत व्ययामशाळा आहे, सोना बाथची सोबतच अनेक खेळांचे कोर्टही कंपनीच्या आवारातच असल्याची माहिती ढोलकीयांनी दिली.
मी ज्यांना इतके काही देऊ केले आहे ते माझे कर्मचारी आहेत. ते मला तोट्यात जाऊन देणार नाहीत असा माझा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही प्रामाणिकपणे काम करणा-यांना सन्मानीत करण्याचे ठरवले. मी जेव्हा १९९१मध्ये कंपनी सुरु केली होती त्यावेळी आम्ही १ कोटी रुपयांचा माल निर्यात करत होतो. आता हाच आकडा ६०० कोटींपर्यंत गेला आहे. आमच्या व्यवसायातील या भरभराटीसाठी आमचे कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळेच आम्ही आमच्या कंपनीतील सर्व १२०० कर्मचा-यांच्या कामाचा लेखाजोखा तपासून आमची कंपनी पुढे नेण्यामध्ये कोणचा किती वाटा आहे याची माहिती गोळा केली. माझ्या मुलाने न्यूयॉर्कमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. मागील सहा वर्षापासून तो मला या व्यवसायात मदत करती आहे. कोणला कोणते बक्षिस द्यायचे हे ठरवण्यासाठी आमची एक पद्धत ठरलेली आहे. ते सर्व काम माझा मुलगाच पाहतो. प्रत्येकाच्या योगदानानुसार त्याला बक्षिस देण्यात येते. इतरांनीही आमच्या १२०० कर्मचा-यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जोमाने आपआपल्या श्रेत्रात प्रगती करावी. कर्मचा-यांकडे कौशल्य असते. मात्र मालकाने त्याच्या कौशल्याला वेळोवेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही सावजीभाई यांनी सांगितले.
माझे सर्व कर्मचारी वेळेवर कर भरतात. आमच्या कर्मचा-यांकडून १० कोटीचा कर भरला जातो. कर्मचा-यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. म्हणूनच आमच्या कंपनीमध्ये हिरा कापणा-याला डायमंड इंजिनिअरची पोस्ट दिली जाते. तर हिरा पॉलिश करणा-याला डायमंड आर्टिस्टची पदवी दिली जाते. या लोकांमध्ये खूप कला असूनही त्यांना फक्त ७० ते ८० हजार पगार आहे. म्हणूनच मी त्यांना इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. मी सोशल बिझनेस करतो. माझ्या कंपनीमध्ये २१ राज्यातील ३६१ गांवांमधील कर्मचारी काम करतात. त्यांचे प्रत्येकाचे पालक मला ओळखतात. मी सर्वांना हरिद्वारच्या यात्रेला घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्हा सर्वांचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत, असे सांगत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या घरच्यांविषयीची भावना देखील व्यक्त केली.
जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देता तेव्हा त्याच्यावरील जबाबदारी वाढते. मी एक व्यवसायीक आहे म्हणून मी कधी तोट्यात जाण्याच सौदा करणार नाही किंवा एखाद्याला उगच सहानभूती दाखवत नाही. मी इतर व्यवसायींकाना कर्मचा-यांना खुष ठेऊन व्यवसाय कसा करावा हे दाखवत आहे. मात्र त्यासाठी कर्मचा-यांनीही माझ्या कंपनीतील कर्मचा-यांसारखे कष्टाळू असावे असे मला वाटते. मी पहिल्यांदा एखादी वस्तू देतो आणि त्याचा मोबदला नंतर घेतो. पण बरेच जण याच्या उलटे करतात त्यामुळे कर्मचारी दु:खी होऊन मनापासून काम करण्याऐवजी करायचे म्हणून काम करतात. माझ्या कंपनीमधून अद्याप एकाही कर्मचा-याला काढून टाकण्यात आलेले नाही. कर्मचा-याला काही येत नसेल तर आमच्या गरजेनुसार त्याला प्रशिक्षण देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवतो. माझ्या कंपनीतून हिरे नाही तर माणसे तयार होऊन बाहेर पडली पाहिजेत, असे मला मनापासून वाटत असल्याचे मत ढोलकीया यांनी व्यक्त केले.
-----------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा  https://web.facebook.com/Small-idea-BIG-MONEY-1626762127611
------------------------------------------
Source : http://maharashtratimes.indiatimes.com/…/artic…/44931077.cms
------------------------------------------